आंबा पिकांची काढणी सल्ला

 आंबा

उन्हाची तीव्रता कमी असताना व पावसाचा अंदाज घेऊन काढणीस तयार असलेल्या चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला देठासह आंबा फळांची काढणी नूतन झेल्याच्या साह्याने सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी चारनंतर करावीत. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढू शकते. आंब्याची फळे काढल्यानंतर सावलीमध्ये ठेवावीत. फळकूज या काढणीपश्‍चात बुरशीजन्य रोगापासून फळांचे संरक्षण करण्यासाठी काढणीनंतर लगेच फळे पोटॅशिअम मेटाबायसल्फाइट ०.०५ टक्का (०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) प्रमाणे ५० अंश सेल्सिअस द्रावणात १० मिनिटे बुडवून ती वाळण्यासाठी सावलीत ठेवावीत. त्यानंतर प्रतवारी करून फळे पिकविण्यासाठी आढीत घालावीत. वाहतूक करण्यासाठी फळांचा रंग बदलू लागल्यानंतर कोरूगेटेड फायबर बॉक्समध्ये फळांचे पॅकिंग करावे. कच्च्या आंब्याची वाहतूक करायची असेल, तर कोरूगेटेड फायबर बॉक्समध्ये पेंढ्याचा वापर करावा. आंबा फळांची वाहतूक सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळेस करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post