रब्बी (उन्हाळ) कांद्याचे खत नियोजन

 कांदा-लसूण

रब्बी (उन्हाळ) कांद्याचे उभे पीक


👉सक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण ग्रेड-II ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ६० आणि ७५ दिवसांनी फवारणी करावी. कांदा पोषणासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी फायदेशीर राहते.
👉फलकिडे (थ्रीप्स) आणि करपा रोगाच्या नियंत्रणाकरिता, कार्बोसल्फान (२५ ईसी) २ मि.लि. अधिक ट्रायसायक्लॅझोल (७५ डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
👉इरिओफाईड माइट्सचा प्रादुर्भाव आढळल्यास, गंधक (८० डब्ल्यूडीजी) २ ग्रॅम किंवा डायकोफॉल (१८.५ ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
👉बरशीनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या कांदा काढणीच्या २० दिवसांपूर्वी बंद कराव्यात.
👉डगळे आलेले कांदे दिसल्यास त्वरित काढून टाकावे.
👉पिकाला जमिनीचा मगदूर, तापमान व पिकाची गरज पाहून ८ ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post