पूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन
महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत येते. पुराच्या पाण्याची पातळी वाढायला लागल्यावर विषारी कीटक, साप इत्यादिच्या दंशाने जनावरे दगावण्याची शक्यता असते. जास्त वेळ खाद्य व पाणी न मिळाल्याने जनावरांची उपासमार होते. पूरस्थिती निवळल्यावर विविध संसर्गजन्य आजारांच्या साथी बाधित भागामध्ये शिरकाव करून त्यातून जनावरांना मोठ्या प्रमाणात बाधा होऊन आजारी पडतात.
💠जनावरांचे व्यवस्थापन
👉🏽बाधित क्षेत्रातून जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. निवारा, चारा व स्वच्छ पाण्याचे नियोजन करावे.
👉🏽विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबाना जनावरे बांधू नयेत.
👉🏽दुधाळ जनावरे, गाभण जनावरे, वासरे यांना त्यांच्या गरजेप्रमाणे संतुलित आहार उपलब्ध करून द्यावा.
👉🏽दुषित पाण्यात भिजलेले अथवा भिजवलेले पशुखाद्य आणि वैरण जनावरांना खाऊ घालू नये.
👉🏽आजारी जनावरांना गरजेनुसार योग्य औषधोपचार करावा.
👉🏽वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे जनावरांवर ताण येतो. त्याचवेळी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. अशा परिस्थितीत आजारांसाठी (घटसर्प, फऱ्या, लाळ्या-खुरकत) प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.
👉🏽काही ठिकाणी डास, कीटकांचा प्रादुर्भाव असल्यास कडूनिंबाचा पाला व शेणाच्या गोवऱ्या पेटवून धूर करावा, जेणेकरून जनावरांचे कीटकांपासून संरक्षण होईल.
👉🏽सर्व जनावरांना आहारात नियमित खनिज क्षार मिश्रण द्यावे.
👉🏽सर्व जनावरांचे जंत निर्मूलन व गोचीड निर्मूलन करून घ्यावे.
👉🏽पुराच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेली जनावरे जमिनीत गाडून तत्काळ विल्हेवाट लावावी. जेणेकरून दुर्गंधी व संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढणार नाही.
➖➖➖

