अतिवृष्टीग्रस्त केळी बागेचे व्यवस्थापन



अतिवृष्टीग्रस्त केळी बागेचे व्यवस्थापन

हे पीक २४ ते ४८ तासापर्यंत बागेत साचलेले पाणी सहन करू शकते. मात्र त्यापुढील काळात मुळांना ऑक्सिजन न मिळाल्यास ती कुजायला लागतात. याचा परिणाम पानांवर होऊन ती पिवळी पडतात. अशा परिस्थितीमध्ये बागेतून पाण्याचा निचरा लवकर करणे आवश्यक आहे. पाण्याचा निचरा केल्यानंतर कार्बेन्डाझिम २ मि.लि. किंवा प्रोपीकोनॅझोल २ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडाच्या बुडा लगत आळवणी करावी. झाडांची मुळे अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी सक्षम होईपर्यंत झाडांवर १९:१९:१९ या विद्राव्य खताची (२० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी) फवारणी करावी.

➖➖➖

 पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी आणि राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती.  कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन  वरुन डाउनलोड करा.  📱📱📱


Post a Comment (0)
Previous Post Next Post