टोमॅटो | विषाणूजन्य रोगांचे लागवडीनंतरचे व्यवस्थापन |

टोमॅटो

                                


विषाणूजन्य रोगांचे लागवडीनंतरचे व्यवस्थापन

👉लागवडीवेळी वाफ्यावर आच्छादनासाठी पांढरा, पिवळा, चंदेरी-काळा किंवा निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पेपरचा वापर करावा. 

👉विषाणूजन्य रोगांचा प्रसार काही तणे, फुलझाडांमार्फत होत असल्याने टोमॅटो पीक तसेच बांध तणविरहित व स्वच्छ ठेवावेत. 

👉रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे, फळे काढून जाळून नष्ट करावीत. 

👉पांढरी माशी, फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी प्रतिएकरी ४० ते ५० पिवळे व निळे चिकट सापळे वापरावेत. 

👉लागवडीनंतर दहा दिवसांनी कार्बोफ्युरॉन (३ सीजी) १३ किलो प्रतिएकरी झाडाभोवती गोलाकार पद्धतीने घालून झाकावे व पाणी द्यावे. 

👉पांढरी माशी, मावा, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी, डायमेथोएट (३० ईसी) २ मि.लि. किंवा सायॲण्ट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मि.लि. अथवा निंबोळी अर्क ५% किंवा अॅझाडीरॅक्टिन (१५०० पीपीएम) ३ मि.लि. किंवा व्हर्टीसिलीयम लेकॅनी ४ ग्रॅम किंवा मेटॅरायझीयम ॲनिसोप्ली ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून दहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. 

👉फळधारणेनंतर जैविक कीडनाशकांचा वापर करावा. 

👉टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, वांगी, गाजर, काकडी, खरबूज, कलिंगड, भुईमूग, बटाटा, उडीद, सोयाबीन, मूग, पपई, कापूस, भोपळा, केळी, बीट, पालक ही टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोगांची यजमान पिके आहेत. या पिकांत विषाणूजन्य रोगांची लागण झाली असल्यास, अशी रोगग्रस्त झाडे उपटून त्यांचा नायनाट करावा. 

👉टोमॅटोची शेवटची तोडणी होताच संपूर्ण पीक काढून नष्ट करावे. पीक तसेच काही दिवस राहिल्यास रोगाचा प्रसार किडींद्वारे नव्या टोमॅटो पिकात होऊन प्रादुर्भाव वाढतो.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post