कापूस
गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन- पतंगांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकरी २ पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर सक्रिय घटक असणारे कामगंध सापळे लावावेत. दर आठवड्याला सापळ्यात अडकलेल्या पतंगांची निरीक्षणे नोंदवावीत. आर्थिक नुकसान पातळी (सलग तीन रात्री ८ पतंग/सापळा/रात्र) ओलांडल्यास शिफारशीत कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी.
- प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात. १० टक्के डोमकळ्या ही आर्थिक नुकसान पातळी समजून फवारणीचे उपाय करावेत.
- प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फुलोरा अवस्थेत निंबोळी अर्क ५० मिलि अधिक नीम तेल ५ मिलि अधिक धुण्याची पावडर १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- जिथे शक्य असेल तिथे उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी मित्रकिडींचे ६०,०००/एकर याप्रमाणे एका आठवड्याच्या अंतराने कपाशीच्या फुलोरा अवस्थेपासून तीनदा प्रसारण करावे.
- हिरवी बोंडे लागल्यानंतर अनिश्चित स्वरूपात एकरी २० बोंडाचे (१ बोंड/झाड) निरीक्षण करावे. आर्थिक नुकसान पातळी (१० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे) ओलांडल्यास शिफारशीत कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी.
- पायरेथ्रॉइड वर्गातील कीटकनाशके कापूस हंगामाच्या सुरुवातीलाच वापरणे कटाक्षाने टाळावे. तसेच एकापेक्षा अधिक कीटकनाशकांचे मिश्रण करून वापरू नये.
कपाशीच्या वाढीनुसार गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केलेली कीटकनाशके (फवारणी प्रतिलिटर पाणी) पेरणीनंतर ६०-९० दिवस: क्विनॉलफॉस (२५ एएफ) २ मिलि किंवा थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम पेरणीनंतर ९०-१२० दिवस: क्लोरपायरिफॉस (२० ईसी) २.५ मिलि किंवा थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम पेरणीनंतर १२० दिवस: फेनव्हलरेट (२० ईसी) १ मिलि किंवा सायपरमेथ्रिन (१० ईसी) १ मिलि - रब्बी (उन्हाळ) कांदा रोपवाटिका व्यवस्थापण आणि टोमॅटो लागवड सल्ला.
सोयाबीन
सोयाबीन साठवणुकीच्या स्थानाचे आदर्श तापमान २५ अंश सेल्सिअस आहे. तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास, तापमान नियंत्रित करणे आवश्यक आहे, अन्यथा बियाण्याच्या उगवणशक्तीवर प्रतिकूल परिणाम होतो. साठवणुकीदरम्यान वातावरणातील आर्द्रता ५० टक्के आदर्श आहे. त्यापेक्षा जास्त आर्द्रता झाल्यास बियाण्याची उगवणशक्ती झपाट्याने कमी होते.