कांदा-लसूण
खत व्यवस्थापन
टोमॅटो
टोमॅटो रोप उगवून येईपर्यंत सकाळ-संध्याकाळ झारीने पाणी द्यावे. रोप उगवल्यानंतर पाटाने गादीवाफ्याच्या चोहोबाजूने पाणी सोडावे. आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी भरू नये, नाहीतर जास्त पाण्यामुळे रोपे कोलमडून मरतात. रोपे उगवून दोन पानांवर आल्यानंतर शिफारशीनुसार कीडनाशकांचा रोपवाटिकेत वापर करताना ते मुळाशेजार�� उतरून मुरेल असे पाहावे, त्यामुळे रोग व किडीचे चांगले नियंत्रण ड्रेचिंगमुळे होऊन रोपांचे संरक्षण होते. रोपवाटिका ४० ते ५० मायक्रॉनच्या पांढऱ्या प्लॅस्टिकच्या कीडप्रतिबंधक जाळीने आच्छादून घ्यावी. त्यासाठी फारशी नेटची आवश्यकता नाही. साधारणतः अडीच फूट उंचीच्या काठ्या रोपवाटिकेतील गादीवाफ्याच्या बाजूने उभ्या करून त्यावर व चोहोबाजूने सभोवती प्लॅस्टिक नेट लावावी. त्यामुळे विषाणू रोग पसरविणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडी उदा. फुलकिडे, पांढरी माशी, तुडतुडे, लाल कोळी, तसेच अन्य किडींपैकी नागअळी आदींचा रोपवाटिकेत शिरकाव होणार नाही. त्यामुळे पुढे विषाणूजन्य रोगही आटोक्यात येण्यास मदत होईल, रोपवाटिकेतील पीक संरक्षणासाठी नंतर फारशी काळजी करावी लागणार नाही. कारण रोपवाटिका जमीन निर्जंतुकीकरणानंतर जर चुकून काही सूक्ष्मजीव राहिलेले असतील, तर बीजप्रक्रिया व ड्रेचिंग आणि पांढऱ्या प्लॅस्टिक नेटचे आच्छादन केल्यामुळे त्यांचाही बंदोबस्त होऊन नवीन किडींना रोपवाटिकेत येण्यास अटकाव होईल. फक्त हवामानात काही बदल झाले, तरच फवारणीची आवश्यकता भासेल. अन्यथा पुढील २१ दिवसांपर्यंत फवारणी घेतली नाही तरी चालते.
कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.