संत्रा-मोसंबी-लिंबू ऑगस्ट ते सप्टेंबर या काळातील नियोजन

सामान्यतः ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाते.
या तापमानाच्या स्थितीमध्ये

बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो. आंबे व मृग बहरांच्या बागांमध्ये फळगळ होताना दिसून येते. यासाठी बुरशीनाशकांसोबत २,४-डी, जिबरेलिक अॅसिड व युरिया, पोटॅशिअम नायट्रेटच्या फवारण्या घेणे आवश्यक आहे.

पहिली फवारणी, जिबरेलिक अॅसिड १.५ ग्रॅम अधिक बोरीक अॅसिड ३०० ग्रॅम अधिक कॅल्शिअम नायट्रेट ०.५ किलो प्रति १०० लिटर पाणी प्रमाणे करावी.

दुसरी फवारणी १५ दिवसांनंतर, २,४-डी किंवा एनएए १.५ ग्रॅम अधिक पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी प्रमाणे घ्यावी.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post