टोमॅटो पिकातील पाणी व्यवस्थापन सल्ला

 टोमॅटो

🍅पाणी व्यवस्थापन 

💧पाणी व्यवस्थापन करताना जमिनीचा मगदूर व हवामान या गोष्टी विचारात घ्याव्यात.
💧हलक्‍या जमिनीत पाण्याच्या पाळ्या जास्त द्याव्यात व त्यामानाने चांगल्या जमिनीत पाण्याच्या पाळ्या कमी द्याव्यात.
💧लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर आंबवणीच��� पाणी द्यावे.
💧पिकाच्या सुरवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची वाढ जास्त होते. म्हणून फुलोरा येईपर्यंत लागवडीपासून अंदाजे ६५ दिवसांपर्यंत पाणी बेताने द्यावे.
💧ठिबक संचामधून पाणी देताना पिकाची दैनंदिन पाण्याची गरज निश्‍चित करून तेवढेच पाणी मोजून द्यावे.
💧पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले व फळे गळणे, फळधारणा न होणे या समस्या निर्माण होतात.
💧पाणी सतत आणि जास्त दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही, रोगराई वाढीस चालना मिळते. झाडाची पाने पिवळी पडतात व उत्पादनात घट येते.
💧पावसाळ्यात पावसाच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी द्यावे. हिवाळ्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळ्यात ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post