भुईमुग पिकातील पाणी व्यवस्थापन

भुईमुग

💧 पाणी व्यवस्थापन 


भुईमुगाची उगवण झाल्यानंतर २० ते २४ दिवसांनी पिकास फुले लागतात. फुलोरा अवस्था ही ४५ ते ६० दिवसपर्यंत सुरू असते. त्याच वेळी पिकास आऱ्या सुटणे, शेंगा लागणे इत्यादी अवस्था एकाच वेळी दिसून येतात. या सर्व अवस्थांमध्ये पाण्याची गरज असते. उत्पादनात घट होऊ नये म्हणून पीकवाढीच्या काळात ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. आधुनिक सिंचन पद्धतीने पाण्याची ४० ते ५० टक्के बचत होते. उत्पादनात २५ ते ३०टक्के वाढ होते. तसेच पिकाची गुणवत्ता व दर्जा वाढतो. सिंचनाची कार्यक्षमता वाढते. रोग, कीड व तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. 

🥜 वाढीच्या विविध अवस्था, कालावधी व वैशिष्ट्ये 

वाढीची अवस्था ----           कालावधी (दिवस) ----  वैशिष्ट्ये 

आऱ्या सुटणे ------------      ३१ ते ५१ ----            फुलाचे फलन होऊन आऱ्या लागणे. 

शेंगा लागण्याची अवस्था ----  ५० ते ७५ ----       आऱ्यांच्या टोकावर शेंगांची वाढ सुरू होणे. 

शेंगेत दाणे भरणे ----------  ७५ ते ९० ----          पूर्ण वाढलेल्या शेंगेत दाणे भरणे. 

पक्वता -------------------    ८० ते १०५ ----          दाण्यांचा रंग फिकट गुलाबी होणे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post