हळद पिक | पाऊस झाल्यास करावयाचे व्यवस्थापन |

हळद पिक पाऊस झाल्यास करावयाचे व्यवस्थापन


हळदीचा पाला कापून ठेवल्यानंतर पाऊस आल्यास वाफसा आल्यानंतर लगेच काढणी करावी. अन्यथा हळकुंडाच्या टोकांना कोंब फुटण्यास सुरवात होते. परिणामी हळदीतील कर्बोदकांचे प्रमाण कमी होते. प्रक्रिया केल्यानंतर हळकुंडावर सुरकुत्या पडतात. हळदीची काढणी केली असल्यास ओली हळकुंडे पावसात भिजल्यास त्यावर फारसा परिणाम होत नाही.
whatsapp हळद ग्रुप बटन

हळद शिजवणे सुरू असल्यास हळदीची काढणी करतेवेळी हळकुंडात ७२-७५ टक्के पाण्याचा अंश असतो. तो शिजवल्यानंतर ८०-८५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढतो. हळद सुकविण्यासाठी टाकल्यानंतर बारा ते पंधरा दिवसांमध्ये तो ८-१० टक्‍क्‍यांपर्यंत कमी होतो. साधारणतः चार ते पाच दिवसांपर्यंत तो ५०-५५ टक्‍क्‍यांच्या दरम्यान असतो. तोपर्यंत हळद पावसामध्ये भिजल्यास हळदीवर फारसा परिणाम होत नाही. परंतु हळद शिजवल्यापासून सुकायला टाकून चार ते पाच दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाल्यास हळद पावसामध्ये भिजू देऊ नये. अन्यथा ती कडक बनते. तिला ‘लोखंडी हळद’ असे म्हणतात. बाजारात तिला खूपच कमी भाव मिळतो. पाऊस आल्यास हळद गोळा करता यावी, यासाठी हळद सुकविण्यासाठी जुने शेडनेट, जुन्या साड्या, ताडपत्री यांचा वापर करावा.
पुढील वर्षासाठी वापरण्यात येणारे बियाणे पावसामध्ये भिजणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा साठवणुकीमध्ये बियाणे सडण्याचा धोका राहील. तसेच पूर्ण सुकलेली हळदही कोणत्याही परिस्थितीत पावसात भिजू देऊ नये. त्यामुळे पाऊस येण्याच्या काळात बियाणे व सुकलेली हळद पॉलिथिनच्या कापडात तात्पुरती गुंडाळून ठेवावी. जेव्हा पाऊस संपून वातावरण पूर्ण कोरडे होईल, तेव्हा पॉलिथिन कापडातून बियाणे वा सुकलेले हळकुंड बाहेर काढून ठेवावे.

➖➖➖

राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. हळद पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन  वरुन डाउनलोड करा.  📱📱📱

Post a Comment (0)
Previous Post Next Post