उन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्यप्रकाश, वादळी वारे तसेच गारपीट या घटकांचा केळीवर परिणाम होतो. अधिक तापमानाचा वातावरणातील सापेक्ष आर्द्रता व जमिनीतील उपलब्ध पाणीसाठ्यावर परिणाम होऊन त्याचा बागांवर अप्रत्यक्षरीत्या परिणाम होतो.
🌡🔆अधिक तापमान व तीव्र सूर्यप्रकाश
👉🏽तापमान ४० अंश सेल्सिअसवर गेल्यानंतर झाडांचे प्रकाशसंश्लेषण मंदावते. तीव्र सूर्यप्रकाशामुळे पानांची पश्चिमेकडील कडा करपते.
👉🏽नवीन लागवड केलेल्या रोपांच्या पानांची सुरळी होऊन पाने उमलत नाहीत. पाने पांढरी राहून करपतात. करपलेल्या ठिकाणी काळे डाग उमटतात.
👉🏽तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर झाडांमधील पाण्याचे होणारे उत्सर्जन वेगाने होते. झाडांमधील विकरे आणि संप्रेरकांची कार्यक्षमता कमी होते. बऱ्याचदा ती नष्ट होतात.
👉🏽उन्हाळ्यात जमिनीचे तापमान वातावरणातील तापमानापेक्षा डू-तीन अंश सेल्सिअसने जास्त असते. यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत जातो. याचा झाडाच्या अन्नद्रव्य शोषून घेण्याच्या क्रियेवर विपरित परिणाम होतो. मुळांची वाढ खुंटते.
👉🏽वातावणातील आर्द्रता २० ते १० टक्क्यांपर्यंत खालावते. या सर्व बाबींचा परिणाम केळीच्या एकूण वाढीवर होतो. वाढ खुंटते.
👉🏽घड निसवणीच्या अवस्थेत असताना निसवण पूर्णपणे न होऊन घड अडकतात, बाहेर पडत नाही. निसवलेल्या घडातील वरच्या बाजूच्या फण्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे करपतात आणि वाळून जातात. घडांचा दांडा काळा पडून घड सटकण्याचे, फण्या गळण्याचे प्रमाण वाढते. झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढते.
💨 उष्णलाटा, वेगवान वारे
👉🏽 उष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी होते, बाष्पीभवनाचा वेग वाढतो. याचा विपरित परिणाम झाडांच्या वाढीवर, घड पोसण्यावर होतो.
👉🏽 वेगवान वाऱ्यामुळे झाडांची पाने फाटतात. परिणामी प्रकाशसंश्लेषण मंदावते.
👉🏽वादळी वारा, गारपिटीमुळे झाडांची पाने फाटून नष्ट होतात, घड पडतात, घड व खोडावर जखमा होतात, झाडे उन्मळून पडतात.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. केळी पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱📱📱